महाराष्ट्र राज्यातील कृषी पुरस्कार
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थांना खालील पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात:
-
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न
-
वसंतराव नाईक कृषीभूषण
-
जिजामाता कृषीभूषण
-
सेंद्रिय शेती कृषीभूषण
-
वसंतराव नाईक शेतीमित्र
-
उद्यानपंडित
-
युवा शेतकरी
-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार
-
स्वरूप:
-
सर्वोच्च राज्यस्तरीय कृषी पुरस्कार
-
रु. ३,००,०००/- धनादेश
-
स्मृतिचिन्ह (ट्रॉफी)
-
प्रशस्तिपत्र
-
पती/पत्नी सह सत्कार
-
-
संख्या: १
-
निकष:
-
राज्यव्यापी स्तरावर उल्लेखनीय व संघटनात्मक कार्य केलेले असावे.
-
केंद्र किंवा राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त असावा.
-
स्वतःच्या नावावर शेती व मुख्य व्यवसाय शेती असावी.
-
आधुनिक पद्धतींचा अवलंब: उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवण, विपणन, निर्यात.
-
शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पीक स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे यात सहभाग.
-
दोन राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये किमान ५ वर्षांचे अंतर.
-
शासन/अर्धशासकीय सेवेत नसावा.
-
यापूर्वी हा पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा पात्र नाही.
-
आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.
-
विभागीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी व गुणांकन.
-
२) वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार
-
स्वरूप:
-
रु. २,००,०००/- धनादेश
-
स्मृतिचिन्ह
-
प्रशस्तिपत्र
-
पती/पत्नी सह सत्कार
-
-
संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)
-
निकष:
-
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असावे.
-
स्वतःच्या नावावर शेती व मुख्य व्यवसाय शेती असावा.
-
उत्पादन, प्रक्रिया, साठवण, विपणन, मूल्यवर्धन यामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले असावे.
-
यांत्रिकीकरण, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती, गांडुळखत इ. तंत्रज्ञान अवलंब.
-
शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिलेली असावी.
-
दोन पुरस्कारांमध्ये किमान ३ वर्षांचे अंतर असावे.
-
शासन/अर्धशासकीय सेवेत कार्यरत नसावा.
-
यापूर्वी हाच पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा पात्र नाही.
-
आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.
-
३) जिजामाता कृषीभूषण पुरस्कार (महिला शेतकरी)
-
स्वरूप:
-
रु. २,००,०००/- धनादेश
-
स्मृतिचिन्ह
-
प्रशस्तिपत्र
-
-
संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)
-
निकष:
-
महाराष्ट्रातील सर्व महिला शेतकरी पात्र.
-
स्वतःच्या किंवा पतीच्या नावावर शेती असावी.
-
सेंद्रिय शेती, प्रक्रिया, मूल्यवर्धन यामध्ये उल्लेखनीय कार्य.
-
महिला शेतकऱ्यांनी इतरांना मार्गदर्शन व तंत्रज्ञान प्रसार केलेले असावे.
-
दोन पुरस्कारांमध्ये किमान ३ वर्षांचे अंतर.
-
व्यक्ती शासन/अर्धशासकीय सेवेत नसावी.
-
पतीला मिळालेला पुरस्कार पत्नीस पुन्हा देता येणार नाही.
-
यापूर्वी हा पुरस्कार मिळाल्यास पुन्हा पात्र नाही.
-
आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.
-
४) कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार
-
स्वरूप:
-
रु. २,००,०००/- धनादेश
-
स्मृतिचिन्ह
-
प्रशस्तिपत्र
-
-
संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)
-
निकष:
-
प्रमाणित सेंद्रिय शेती केलेली असावी.
-
सेंद्रिय शेती स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे यामध्ये सहभाग.
-
स्वतः खत निर्मिती व वापर केलेला असावा.
-
इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन दिलेले असावे.
-
एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक कीटकनाशके वापर.
-
सेंद्रिय शेती किमान ५ वर्षे सातत्याने केलेली असावी.
-
शासन सेवेत कार्यरत नसावा.
-
यापूर्वी हाच पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा पात्र नाही.
-
आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.
-
संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक.
-



