कृषी विभाग, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र शासन)

हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

कृषी विभागाद्वारे दिले जाणारे विविध कृषी पुरस्कार

 


कृषी विभागाद्वारे दिले जाणारे विविध कृषी पुरस्कार 


महाराष्ट्र राज्यातील कृषी पुरस्कार

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थांना खालील पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात:

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न

  • वसंतराव नाईक कृषीभूषण

  • जिजामाता कृषीभूषण

  • सेंद्रिय शेती कृषीभूषण

  • वसंतराव नाईक शेतीमित्र

  • उद्यानपंडित

  • युवा शेतकरी

  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार


१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार

  • स्वरूप:

    • सर्वोच्च राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

    • रु. ३,००,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह (ट्रॉफी)

    • प्रशस्तिपत्र

    • पती/पत्नी सह सत्कार

  • संख्या: १

  • निकष:

    1. राज्यव्यापी स्तरावर उल्लेखनीय व संघटनात्मक कार्य केलेले असावे.

    2. केंद्र किंवा राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त असावा.

    3. स्वतःच्या नावावर शेती व मुख्य व्यवसाय शेती असावी.

    4. आधुनिक पद्धतींचा अवलंब: उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवण, विपणन, निर्यात.

    5. शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पीक स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे यात सहभाग.

    6. दोन राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये किमान ५ वर्षांचे अंतर.

    7. शासन/अर्धशासकीय सेवेत नसावा.

    8. यापूर्वी हा पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा पात्र नाही.

    9. आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.

    10. विभागीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी व गुणांकन.


२) वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार

  • स्वरूप:

    • रु. २,००,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह

    • प्रशस्तिपत्र

    • पती/पत्नी सह सत्कार

  • संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)

  • निकष:

    1. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असावे.

    2. स्वतःच्या नावावर शेती व मुख्य व्यवसाय शेती असावा.

    3. उत्पादन, प्रक्रिया, साठवण, विपणन, मूल्यवर्धन यामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले असावे.

    4. यांत्रिकीकरण, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती, गांडुळखत इ. तंत्रज्ञान अवलंब.

    5. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिलेली असावी.

    6. दोन पुरस्कारांमध्ये किमान ३ वर्षांचे अंतर असावे.

    7. शासन/अर्धशासकीय सेवेत कार्यरत नसावा.

    8. यापूर्वी हाच पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा पात्र नाही.

    9. आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.


३) जिजामाता कृषीभूषण पुरस्कार (महिला शेतकरी)

  • स्वरूप:

    • रु. २,००,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह

    • प्रशस्तिपत्र

  • संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)

  • निकष:

    1. महाराष्ट्रातील सर्व महिला शेतकरी पात्र.

    2. स्वतःच्या किंवा पतीच्या नावावर शेती असावी.

    3. सेंद्रिय शेती, प्रक्रिया, मूल्यवर्धन यामध्ये उल्लेखनीय कार्य.

    4. महिला शेतकऱ्यांनी इतरांना मार्गदर्शन व तंत्रज्ञान प्रसार केलेले असावे.

    5. दोन पुरस्कारांमध्ये किमान ३ वर्षांचे अंतर.

    6. व्यक्ती  शासन/अर्धशासकीय सेवेत नसावी.

    7. पतीला मिळालेला पुरस्कार पत्नीस पुन्हा देता येणार नाही.

    8. यापूर्वी हा पुरस्कार मिळाल्यास पुन्हा पात्र नाही.

    9. आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.


४) कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

  • स्वरूप:

    • रु. २,००,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह

    • प्रशस्तिपत्र

  • संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)

  • निकष:

    1. प्रमाणित सेंद्रिय शेती केलेली असावी.

    2. सेंद्रिय शेती स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे यामध्ये सहभाग.

    3. स्वतः खत निर्मिती व वापर केलेला असावा.

    4. इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन दिलेले असावे.

    5. एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक कीटकनाशके वापर.

    6. सेंद्रिय शेती किमान ५ वर्षे सातत्याने केलेली असावी.

    7. शासन सेवेत कार्यरत नसावा.

    8. यापूर्वी हाच पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा पात्र नाही.

    9. आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.

    10. संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक.


५) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

  • स्वरूप:

    • रु. १,२०,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह

    • प्रशस्तिपत्र

  • संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)

  • निकष:

    1. कृषी प्रसार, प्रचार कार्य करणारे व्यक्ती, संस्था, पत्रकार, वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल, रेडिओ केंद्र पात्र.

    2. आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसारात योगदान दिलेले असावे.

    3. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारे कार्य.

    4. सेंद्रिय शेती, सिंचन तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन या क्षेत्रात जागृती केलेली असावी.

    5. आवश्यक कागदपत्रे: संबंधित कामाचे पुरावे, प्रकाशन/कार्यक्रमांच्या प्रती. चारित्र्याचा दाखला


६) उद्यानपंडित पुरस्कार

  • स्वरूप:

    • रु. १,००,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह

    • प्रशस्तिपत्र

  • संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)

  • निकष:

    1. फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे शेतकरी पात्र.

    2. फळबाग, भाजीपाला उत्पादन, रोपवाटिका, ऊस, मसाले, औषधी वनस्पती उत्पादन यामध्ये योगदान.

    3. प्रक्रिया, साठवण, पॅकहाऊस, विपणन यामध्ये कार्य.

    4. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला असावा.

    5. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रसार केलेला असावा.

    6. दोन पुरस्कारांमध्ये किमान ३ वर्षांचे अंतर.

    7. शासन/अर्धशासकीय सेवेत नसावा.

    8. आवश्यक कागदपत्रे: चारित्र्याचा दाखला, स्वघोषणापत्र, ७/१२, ८-अ.


७) युवा शेतकरी पुरस्कार

  • स्वरूप:

    • रु. १,२०,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह

    • प्रशस्तिपत्र

  • संख्या: ८ (प्रत्येक विभागातून एक)

  • निकष:

    1. वय १८ ते ४० वर्षे.

    2. स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावावर शेती असावी.

    3. आधुनिक कृषी तंत्रज्ञान अवलंब करणारा असावा.

    4. सेंद्रिय शेती, पिक व्यवस्थापन, सिंचन तंत्रज्ञान यामध्ये योगदान.

    5. सामाजिक माध्यमांद्वारे कृषी माहितीचा प्रसार करणारे कार्य.

    6. दोन पुरस्कारांमध्ये किमान ३ वर्षांचे अंतर.

    7. शासन/अर्धशासकीय सेवेत कार्यरत नसावा.

    8. आवश्यक कागदपत्रे: ७/१२, ८-अ, स्वघोषणापत्र, चारित्र्याचा दाखला.


८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

  • स्वरूप:

    • रु. ४४,०००/- धनादेश

    • स्मृतिचिन्ह

    • प्रशस्तिपत्र

  • संख्या: ४० (सामान्य गट – ३४, आदिवासी गट – ६)

  • निकष:

    1. मुख्य व्यवसाय शेती असावी.

    2. आधुनिक तंत्रज्ञान वापर, नवीन पद्धती अवलंब.

    3. दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती, शेतकऱ्यांना मार्गदर्शन या क्षेत्रात योगदान.

    4. स्वघोषणापत्र, चारित्र्याचा, ७/१२, ८-अ आवश्यक.

    5. यापूर्वी हाच पुरस्कार मिळाल्यास पुन्हा पात्र नाही.




प्रस्ताव सादरीकरणाची प्रक्रिया

  1. कालावधी :

    • प्रत्येक पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत शेतकरी/संस्थेने केलेले काम विचारात घेतले जाईल.

  2. अर्जासोबत जोडायची कागदपत्रे :

    • दोन पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्रे

    • ७/१२ उतारा, ८-अ

    • स्वघोषणापत्र (प्रपत्र ड)

    • पोलीस चरित्र दाखला

    • शेतकरी/संस्थेच्या कार्याचा तपशील व पुरावे

    • संबंधित पुरस्काराच्या निकषानुसार कागदपत्रे

  3. अर्ज सादर करण्याची पद्धत :

    • अर्ज → तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे

    • छाननीनंतर → जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

    • जिल्हा स्तरावर गुणांकन व शिफारस

    • नंतर विभागीय सहसंचालक कृषी कार्यालयाकडे पाठवणे

    • विभागीय स्तरावर समितीमार्फत गुणांकन

    • कृषी आयुक्तालय, पुणे येथे अंतिम प्रस्ताव सादर

    • सचिवालय स्तरावर अंतिम निवड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रीय अन्नधान्य पिके आणि पोषण सुरक्षा

  राष्ट्रीय अन्नधान्य पिके आणि पोषण सुरक्षा